राष्ट्रीय

मोदींनी ओबीसींसाठी काय केले?: राहुल गांधी

कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार, 22 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन 2011 साली झालेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि ओबीसी आणि इतर दुर्बल घटकांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी नवीन जातीय जनगणना करावी अशी मागणी केली. संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) 2010 मध्ये आणलेल्या विधेयकांतर्गत इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्याची तरतूद करण्यात आली नसल्याची खंत यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “जनगणनेसाठी इतका विलंब कशासाठी? आता जातीय जनगणना झाली पाहिजे. त्यासोबतच, 2011 साली झालेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी एकाच वेळी जाहीर झाली पाहिजे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर जातीय जनगणना करेल आणि त्यानंतर देशाला येथील ओबीसी, दलित आणि आदिवासींची एकूण लोकसंख्या कळेल.”

पंतप्रधान मोदी रोज ओबीसींबद्दल बोलतात पण ओबीसींसाठी काय केले जात आहे ते अद्याप समजू शकले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, “मी संसदेत याविषयी बोललो, जर ते ओबीसींसाठी काम करतात, तर देशात 90 पैकी फक्त 3 सचिव ओबीसी का आहेत? देशाच्या अर्थसंकल्पावर हे ओबीसी अधिकारी किती आणि काय नियंत्रण ठेवत आहेत? मला समजत नाही की पंतप्रधान मोदी रोज ओबीसींबद्दल बोलतात पण त्यांनी त्यांच्यासाठी काय केले?”

हे ही वाचा 

धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, फळबागांसाठीची खते मिळणार फुकटात !

धनगर आरक्षणावर अद्याप तोडगा नाहीच! सह्याद्रीवरील बैठक निष्फळ..

चंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांचे कान उपटले !

ओबीसी खासदारांवर आरोप करत ओबीसी खासदारांना निर्जीव पुतळ्याची उपमा त्यांनी दिली. “भारतात किती ओबीसी आहेत आणि त्यांना किती सहभाग मिळतो हे मला शोधायचे आहे. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीएवढा वाटा मिळायला हवा. तुम्ही भाजपच्या कोणत्याही खासदाराला विचारा की तो काही निर्णय घेतो का? कायदा बनवण्याच्या कामात सहभागी होता का? OBC खासदारांना पुतळा बनवले गेले आहे, त्यांच्याकडे अजिबात सत्ता नाही,”

लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

8 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

10 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

11 hours ago