संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असुन आज संसदेत ५० सदस्यांनी खासगी विधेयके लोकसभेत मांडली. भाजपचे खासदार रवि किशन यांनी शुक्रवारी लोकसभेत लोकसंख्यावाढ नियंत्रण विधेयक मांडले, रवि किशन हे चार आपत्यांचे वडील आहेत. आज तक या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले. ते म्हणाले की, मला चार मुले झाली तेव्हा लोकसंख्यावाढ नियंत्रण कायदाच अस्तित्वात नव्हता त्यामुळे काँग्रेसच याला जबाबदार आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसने आपल्या सत्ताकाळामध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत कोणतेही विधेयक मांडले नाही, जर असे विधेयक त्यांनी आणले असते तर इतकी मुले जन्माला आली नसती जर काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर आम्ही थांबलो असतो असे रवि किशन म्हणाले. या न्यूज चॅनलच्या मुलाखती दरम्यान रवि किशन यांच्यासह मनोज तिवारी यांच्यासह आणखी एकजण उपस्थित होते. मनोज तिवारी हे तीन मुलांचे वडील होणार आहेत.
हे सुद्धा वाचा
सामाजिक न्याय विभागात लबाडीला ऊत; 100 रुपयांच्या कवितेचे पुस्तक 684 रुपयात, तरतूद नसताना 36 कोटींची खरेदी!
IAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती
यावेळी बोलताना रवि किशन यांनी आपल्या पत्नीला प्रत्येक मुल झाल्यानंतर काय त्रास झाला याबाबत देखील यावेळी भाष्य केले. आयुष्यात स्थीर होण्यासाठीचा तो माझा स्ट्रगलींगचा काळ होता. त्यावेळी माझे मन विचार करत नव्हते, मी समजदार देखील नव्हतो. मी काम करत होतो. जेव्हा मी यशस्वी झालो, माझ्याकडे जेव्हा पैसा आला, मी आयुष्यात जेव्हा स्थिरस्थावर झालो तेव्हा मी माझ्या पत्नीकडे पाहिले, आज मला तिच्यासाठी मला खुप अपराधी वाटते. जर काँग्रेसने असे विधेयक आधी आणले असते तर आम्ही त्यावेळी थांबलो असतो, असा तर्क यावेळी रवि किशन यांनी मांडला. यावेळी ते म्हणाले या कार्यक्रमातून मी लोकसभेत गेल्यानंतर लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…
हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…