31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाArrest Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अटक होणार! कारण...

Arrest Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अटक होणार! कारण ठरतोय रोहित शर्माचा चाहता

विराट कोहलीच्या चाहत्याने तमिळनाडूमध्ये रोहित शर्माच्या चाहत्याचा खून केला आहे. त्यामुळे कोहलीला अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर नाराजी पसरवली.

भारतात क्रिकेटप्रती असणारे प्रेम जगज्ञात आहे. त्यामुळे इथे क्रिकेटचे आणि विविध क्रिकेटपटूंचे चाहते ढिगानी आढळतात. अनेकदा दोन वेगवेगळ्या क्रिकेटपटूंच्या चाहत्यांमधील वाद झाल्याचे पाहायला मिळत असतात. काही वेळेस हे वाद अगदी शिगेला पोहोचतात आणि त्या छोट्या वादाचे रुपांतर मोठमोठ्या भांडणात होते. असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या चाहत्यांमध्ये. विराट कोहलीच्या चाहत्याने तमिळनाडूमध्ये रोहित शर्माच्या चाहत्याचा खून केला आहे. त्यामुळे कोहलीला अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर नाराजी पसरवली. पोलिसांनी सांगितले की, विघ्नेश, रोहित शर्माच्या चाहत्याने गरमागरम संभाषणात धर्मराजची थट्टा करण्यास सुरुवात केली होती, तसेच त्याच्यात बोलण्यात दोष असल्याने त्याची लाज वाटली होती आणि त्याची तुलना कोहली आणि आरसीबीच्या कामगिरीशी केली होती.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतातील सध्याचे दोन सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत आणि ते दोघेही माजी कर्णधार आहेत. हे आश्चर्यकारक नाही की त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रीयता मिळते आणि काही वेळा या क्रिकेटपटूंचे चाहते सोशल मीडियावर आणि बाहेर चर्चा करतात की दोघांमध्ये नेमक कोण चांगलं आहे अशी तुलना नेहमीच होत आली आहे. पूर्वी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग आणि ब्रायन लारा तसेच भारतीय संघात सचिन आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात असाच वाद व्हायचा. तथापि, अशा वादविवादांवर एका चाहत्याने दुसर्‍याला मारल्याबद्दल तुम्ही कधीही ऐकले नसेल. तमिळनाडूमध्ये नेमके हेच घडले आहे, जिथे दोन चाहत्यांमध्ये विराट व रोहित यांचावरुन वाद झाला आणि त्यामुळे रक्त सांडले.

हे सुद्धा वाचा

Tiger 3 Poster Out : सल्मानच्या नव्या लूकने घातली चाहत्यांना भुरळ! टायगर 3 चित्रपटाचा पोस्टर आऊट

Thane Roads Closed : रस्त्याच्या कामासाठी ठाण्यातील रस्ते बंद! ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा

Joe Biden : अखेर भारताचे म्हणणे अमेरिकेने मान्य केले! जो बायडन म्हणाले, ‘पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देश’

मल्लूरमधील पी विघ्नेश आणि धर्मराज नावाचे दोन मित्र मंगळवारी रात्री सिडको इंडस्ट्रियल इस्टेटजवळ ड्रिंक्स घेत क्रिकेटवर चर्चा करत होते. वाद अधिकच तापला आणि दोघांमधील धर्मराज, कोहली आणि आरसीबीचा चाहता संतापला आणि त्याने विघ्नेश, रोहितच्या चाहत्यावर बाटली आणि क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला ज्यामुळे विघ्नेशचा मृत्यू झाला. त्यानंतर धर्मराज मृत्यूच्या ठिकाणाहून पळून गेला.

पोलिसांनी सांगितले की, तापलेल्या संभाषणाच्या वेळी विघ्नेशने धर्मराजची थट्टा करण्यास सुरुवात केली होती, तसेच धर्मराजच्या बोलण्यात दोष असल्याने त्याची तुलना कोहली आणि आरसीबीच्या कामगिरीशी केली होती. “त्यांच्या वादादरम्यान, विघ्नेशने आरसीबी आणि विराट कोहलीची कथितपणे खिल्ली उडवली होती. विघ्नेशला धर्मराजला बॉडी शेमिंग करण्याची सवय होती, ज्याला बोलताना अडथळा निर्माण होयचा. त्या दिवशी त्याने आरसीबी टिमची तुलना धर्मराजच्या अडखळत बोलण्यावरुन केली होती. यामुळे संतापलेल्या धर्मराजने विघ्नेशवर बाटलीने हल्ला केला आणि नंतर त्याच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने वार केले. धर्मराज लगेचच घटनास्थळावरून पळून गेला,” असे पोलिसांनी सांगितले.

सिडको कारखान्यात कामावर जाणाऱ्या कामगारांना सकाळीच विघ्नेशचा मृतदेह दिसला. पोलिसांनी आता विघ्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अरियालूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी