आजवर भारताने अनेकदा अनेक ठिकाणी पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश असल्याचे बोलले आहे. यामागील कारणेही भारताने वेळोवेळी दिली आहेत. मुख्य म्हणजे पाकिस्तानात वाढणारा आतंकवाद हा संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचेही भारताने जगाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अखेर आता भारताच्या या सांगण्यावर अमेरिकेला विश्वास बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. त्यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी डेमोक्रॅटिक काँग्रेसनल कॅम्पेन कमिटीच्या स्वागत समारंभात सांगितले की, “माझ्या मते पाकिस्तान कदाचित जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, पण त्याचा तुटवडा आहे, असेही बिडेन म्हणाले.
यापूर्वी अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले होते. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबतच्या संबंधांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहत नाही, दोघेही वेगवेगळ्या प्रकारे अमेरिकेचे भागीदार आहेत.
हे सुद्धा वाचा
Eknath Shinde : शिंदेंच्या हातून ढाल-तलवार निसटणार? शीख समाजाने घेतला चिन्हावर आक्षेप
T20 World Cup : वर्ल्डकप आधीची पत्रकार परिषद बाबर आझमने गाजवली! कर्णधार रोहित बाबत केलं मोठं विधान
बिडेन प्रशासनाचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला अद्ययावत अमेरिकन एफ-16 सुरक्षा मदत देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. F-16 लढाऊ विमानांच्या देखभालीशी संबंधित पाकिस्तानला दिलेले पॅकेज दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आहे, या अमेरिकेच्या युक्तिवादावर परराष्ट्र मंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
जयशंकर म्हणाले होते की, एफ-16 लढाऊ विमाने कोठे आणि कोणाच्या विरोधात वापरली जातात हे सर्वांना माहिती आहे. भारतीय-अमेरिकनांशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘तुम्ही या गोष्टी बोलून कुणालाही फसवत नाही आहात.’
नुकतेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष सत्रादरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचे गोडवे गाळले. रशिया-युक्रेन संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्र महासभेत झालेल्या चर्चेदरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने बुधवारी (१२ ऑक्टोबर) पाकिस्तानला फटकारले. भारताने पाकिस्तानवर टीका केली आणि म्हटले की इस्लामाबादची अशी विधाने आंतरराष्ट्रीय समुदायाचा “सामूहिक अवमान” पात्र आहेत.