राजकीय

राजकीय संकट असतानाही उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, तरुणांसाठी घेतले स्तुत्य निर्णय

टीम लय भारी

मुंबई : आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पाच निर्णयांना मान्यता देण्यात आली. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णतः कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आले. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते.
तसेच कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रिय समित्यांना कार्यवाही करण्याचे आदेश आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत.

कोरोना काळात राज्यात 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व इतर ठिकाणी पडताळणीच्या वेळेस अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करुन हे खटले मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या क्षेत्रिय समितीला कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली. ही कार्यवाही करताना सरकारी नोकरांवर हल्ले झालेले नसावेत. खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे.

2017 ते 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत कर्जाची परतफेड केली असल्यास 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल. 2019-20 या वर्षांतील घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमे इतका प्रोत्साहन पर लाभ देण्यात येईल. या योजनेसाठी सरकारी बॅंका, खासगी बॅंका, ग्रामीण बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थानी दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेतले जाईल.

हे सुद्धा वाचा : मेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं समंदर हूँ ‘। लैटकर वापस आउॅंगा।

‘थंड‘ डोक्याचे षडयंत्र ; की ‘ईडी‘ची काडी

Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपसोबत जाण्याची तयारी

पूनम खडताळे

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

5 mins ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

10 mins ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

4 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

4 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

5 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

5 hours ago