उद्धव ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यांपासून अनेक धक्के बसत आहेत. काही गोष्टी ठाकरे गटासोबत चांगल्या होत असल्या तरी आजही अनेकजण ठाकरे गटाची साथ सोडून साथ जात आहेत. यांतच आता अभिनेत्री दीपाली सय्यद या लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याआधी ‘लय भारी’च्या प्रतिनिधींनी दीपाली सय्यद यांना त्यांच्या राजकीय सर्प्राइजबद्दल विचारले होते, त्यावेळी लवकरच राजकीय सरप्राईज देणार असे उत्तर दीपाली सय्यद यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु आता याबाबतचा खुलासा दीपाली सय्यद यांच्याकडून करण्यात आला आहे. दीपाली सय्यद या लवकरच शिंदे गटात जाणार आहेत. पण त्याआधी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर आरोप सुद्धा केले आहेत.
शिवसेनेसोबत शिंदे गटाने गद्दारी केल्यानंतर दीपाली सय्यद यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद करण्यासाठी बैठक आयोजित करू, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर दीपाली सय्यद यांचा सूर हळूहळू बदललेला दिसला. तो सूर आता इतका बदलला की, दीपाली सय्यद यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर माध्यम प्रतिनिधींशी दीपाली सय्यद यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. प्रसार माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे यांना चिल्लर म्हणत टीका केली.
हे सुद्धा वाचा
Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर
सुषमा अंधारे यांचा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप
Supriya Sule : सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही!
प्रसार माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरेंवर सुद्धा आरोप केले. मुंबई महानगरपालिका कोणाची आहे ? हे सर्वांना माहित आहे. मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके बंद झाल्याने रश्मी वहिनींना होत असल्याचे दीपाली सय्यद यांनी सांगितले. तसेच शिंदे गटाने गद्दारी नाही केली तर तो त्यांचा हक्क आहे, असेही दीपाली सय्यद म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी दीपाली सय्यद यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळतेय. तोंडाने पक्ष कसा फोडायचा याचे उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत, अशी टीका दीपाली सय्यद यांच्याकडून करण्यात आली. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणले होते. त्यामुळे आता त्यांना साथ देणार. जी व्यक्ती बरोबर आहे, त्या व्यक्तीसोबत जाणे गरजेचे असल्याचे सय्यद यांनी यावेळी सांगितले.
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…
जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…
नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…
नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…
हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…