राजकीय

…अन्यथा राज्यभर ‘कुर्सी छोडो आंदोलन’ करू: नाना पटोले

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. दरम्यान महाअर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखूनही गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. यामुळे विरोधकांनी शासनाला खडे बोल सुनावले आणि विधासभेत याविरोधात निदर्शने देखील करण्यात आले.

दरम्यान आजपासून जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीला जोर धरत राज्यात सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत, तर नाशिकहून हजारो-लाखों शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास राज्यभरात कुर्सी छोडो आंदोलन करू, असे वक्तव्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. राज्य सरकार शेतकर्‍यांना मदत करत नाही, शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा आम्ही राज्यभर ‘कुर्सी छोडो आंदोलन’ करू, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

दरम्यान मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या महाघोटाळ्याविरोधात मौन धारण केलेल्या भाजप सरकारच्या विरोधात काल (13 मार्च) राजभवनावर काँग्रेसच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने सामील झाले.

फोटो सौजन्न -ट्वीटर : अदानीच्या महाघोटाळ्याविरोधात भाजप सरकारविरोधात आंदोलन छेडताना कॉंग्रेसचे नाना पाटोले व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

गिरगाव चौपाटी ते राजभवन येथे हा मोर्चा काढून काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले. या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सतेज (बंटी) पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ये रिश्ता क्या कहलाता है… मोदी अदानी भाई भाई, देश बेचके खाई मलाई… अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. त्यांच्या हातात मोदी व अदानी विरोधी घोषणांचे बॅनर होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली.

हे सुद्धा वाचा :

पुन्हा एकदा मुंबईत लाल वादळ धडकणार; राज्यात शेतकरी आंदोलनाचा एल्गार

18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार? पाच शेतकरी संघटनांचा संसद भवनावर मोर्चा

Team Lay Bhari

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

4 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

5 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

5 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

5 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

6 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

8 hours ago