टीम लय भारी
मुंबई : राज्यात कोरोना, चक्रीवादळे आणि पूर यांसारखी संकटे सतत चालू आहेत. याच परिस्थितीत मुख्यमंत्री राज्यकारभार सावरण्याचा प्रयत्न करत असताना भाजप मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला. (BJP minister Nitesh rane blaming CM uddhav thackeray about performing black magic pooja at CM’s place)
फुकट मिळालेले मुख्यमंत्रीपद राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू केली जाते. असा आरोप भाजप मंत्री नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत ट्विटर वर केला आहे. (One more pooja CM should perform in order to calm maharashtra disasters down)
टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण
स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो..
तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून २८ नोव्हेंबर २०१९ ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल !!— nitesh rane (@NiteshNRane) July 24, 2021
मुख्यमंत्री आज तळीये गावी पाहणीसाठी गेले असता, नितेश राणे म्हणाले, “स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळी जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो.. आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाच काय ती दूर होईल!!” (Nitesh rane expressed on Twitter)
चिपळूण – खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत
तळीये गावातून परतताना मृत्युमुखी पडलेल्या माणसांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी 2 लाख तर राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख मदत जाहीर झाली आहे. याचं धरतीवर यावेळी सुद्धा पुरग्रस्तांना मेणबत्या आणि बिस्किटांवर बोळवण करू नका, आणि मदत खरोखरीच पोहोचली जाईल अशी व्यवस्था करा, असे विचार सामान्य जनता सोशल मीडियावर मांडत आहे.