एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. ही जखम उद्धव ठाकरे गटाच्या मनात अखंड भळभळत आहे. असे असताना २० जून हा जागतिक जागतिक गद्दार दिन जाहीर करा असं पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिलं आहे. हे कमी म्हणून की काय भाजपा आमदार नितेश राणे यांनी, २७ जुलै हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस देशद्रोही दिन म्हणून साजरा करा, असे ट्विट युनाटेड नेशनला केले आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षात युनोला वेठीस धरण्याचा प्रयत्न राज्यातील राजकारण्यांनी सुरू केला आहे, तोच मनोरंजक ठरण्याची चिन्हे आहेत.
२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच बॉम्ब फुटला. शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके (५० कोटी) रुपये घेतले त्यामुळे २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. युनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय, त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे. त्याला तितकेच तिखट उत्तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले आहे.
मुख्यमंत्री पदाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, असा आरोप राणे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 सख्ख्या भावासारखा उद्धव ठाकरेंना सांभाळलं. असे असताना त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली. जी भाषा संजय राऊत यांची तीच भाषा उद्धव ठाकरेंची, उद्धव ठाकरे हे घाणेरड्या वृत्तीचे आहेत.
चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात सर्वात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा ‘कवली’ आहे. परवाच्या सभेतील थयथयाट मागील कारण कॅगच्या अहवालनुसार होणारी कारवाई आहे. यात ठाकरे आणि पाटणकर यांचे कपडे फाटले जाणार, असेही राणे यांनी सांगितले. पाटणकर, सरदेसाई यांचे जेलमध्ये जायचे दिवस जवळ आलेत. आदित्य ठाकरे यांनी 25-30 वर्षे मुंबईला कसं लुटलं त्याचे प्रेझेन्टेशन दाखव. 33 देशांत ठाकरेंचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीने लपवले आहेत. सरकारी भाचा सरदेसाई मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठी पाठी फिरतोय, बाळासाहेब ठाकरे यांना हे कळले असते तर दोन वर्धापनदिन झाले नसते, असंही आरोप राणे यांनी केला.
हे सुद्धा वाचा
भगतसिंह यांची प्रेरणा चंद्रशेखर आझादच ! सुधीर मुनगंटीवार
ओडिशा रेल्वे अपघातप्रकरण, सिग्नल यंत्रणा विभागातील जुनियर इंजीनियरचं घर सीबीआयने केलं सील
मुंबईत बांगलादेशी रोहीनगे वाढले, बेहराम पाडा, मालवणी भागात त्यांना वीज-पाणी ठाकरेंच्या सत्ता काळात महापालिकेने पुरवले. पक्षात राहून उद्धव ठाकरेंना कोण संपवत असेल तर ते संजय राऊत आहेत. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता पण येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून 2017 ला मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने वैक्सींन तयार करून जगाला दिली, हे बालबुद्धीच्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असंही आरोप राणे यांनी केला.