राजकीय

माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

दापोलीतील एका वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात इडीच्या अधिकाऱ्यांनी रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक सदानंद कदम यांना आज शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. रिसॉर्टचा मुद्दा समोर असला तरी एका राजकीय पक्षाच्या सभेला आर्थिक पाठबळ दिल्यामुळे या कारवाईला वेग आला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ईडीनं या कारवाईची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारवाईच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यातील वादग्रस्त साई रिसॉर्टने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. या रिसॉर्टची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहे. या प्रकरणी इडीकडून एका उद्योजकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. विविध उद्योगात यशस्वी असलेल्या या उद्योजकावर राजकीय वक्रदृष्टी असल्याने अशा पद्धतीची कारवाई अपेक्षितच केली जात होती. रिसॉर्ट हे समोर दिसणारे कारण असले तरी त्यामागे अन्य काही कारणेही असल्याची मोठी चर्चा आहे.

एका राजकीय पक्षाच्या सभेला माणसे आणण्यासह सर्व प्रकारचा खर्च या उद्योजकाने केला आहे. राजकारणात कोठेही थेट सहभागा नसलेल्या या उद्योजकाचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या कारवाईला अधिक गती देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याचप्रमाणे साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. कदम यांच्या अटकेमुळं अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : अखेर ईडीने किरीट सोमय्यांचा हट्ट पुरविला !

Anil Parab Bail : अनिल परब यांना मोठा दिलासा; रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हाणी होत असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.  त्याचप्रमाणे काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी वेगवेगळे दावे करत आहेत. हा रिसॉर्ट चुकीच्या पद्धतीने बांधली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सतत होणाऱ्या कारवायांमुळे हे रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

9 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

9 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

10 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

10 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

11 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

12 hours ago