राजकीय

शरद पवारांच्या दबावात उद्धव ठाकरेंनी अहमदनगरचे नामांतर केले नाही; गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

शिंदे फडणवीस सरकारने काल चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अहमदनगचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दबावात येऊन अहमदनगरचे नामांतर केले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवींचे जन्मगाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असे करावे, अशी लोकांची जनभावना होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, सभागृहात मागणी केली. परंतू शरद पवारांच्या दबावाखाली उद्धव ठाकरेंनी नामांतराचा निर्णय केला नाही.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, आता आमचे सरकार आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि 11 महिन्याच्या आत सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचे घोषीत केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो.

हे सुद्धा वाचा
मान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार !

राज ठाकरेंचे मोदींना पत्र – ‘देश की बेटियाँ’ना न्याय द्या !

कोकणातून मासे गायब होणार; एकीकडे रिफायनरीचे सावट, दुसरीकडे LED फिशिंगमुळे कोकणातील मासेमारी धोक्यात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशामध्ये पहिल्यांदा रामराज्य यावे यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. जेव्हा जेव्हा मुस्लीम आक्रमकांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली. तेव्हा त्या सर्व मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याचे काम हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर केले. असे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जनतेला, तसेच अहिल्याभक्तांना आवाहन करतो की, आपण अहिल्यादेवींची जयंती एक महिनाभर साजरी करावी, जेणेकरुन महाराष्ट्रात उर्जावान वातावरण तयार होईल, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदीप माळी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

6 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago