टीम लय भारी
मुंबई : एक रिक्षावाला मुख्यमंत्रीपदावर पोहोचला, याचा महाराष्ट्रातील तमाम जनतेला आनंद व्हायला हवा. परंतु सामान्य जनतेपासून ते राजकीय क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीपर्यंत जास्तीत जास्त चेहरे दुःखीच दिसत होते. शपथविधी सोहळ्यात खुद्द भाजपमधील तमाम नेत्यांचेही चेहरे पडलेले दिसत होते.एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद ओरबाडले. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणविसांच्या तोंडासमोर आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास सुद्धा शिंदे यांनी बेमालूमपणे स्वतःच्या घशात घातला. त्यामुळे आपले सरकार येवून सुद्धा भाजपच्या नेत्यांचे, विशेषतः फडणवीस यांच्या समर्थकांचे चेहरे पडलेले दिसत होते.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना धोका देण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्येही सल आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख चार पक्षांपैकी कुणालाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद नाही.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटासह बंडखोरी करताना देशभर हिडीस प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे देशाच्या वेशीवर नेऊन टांगली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेमध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत नाराजी होती.
अशातच उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून महाराष्ट्रातील जनतेशी दोन वेळा संवाद साधला. हा संवाद ऐकल्यानंतर सामान्य जनतेमध्ये ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम उत्कृष्ट होते. एकनाथ शिंदे व बंडखोरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना सामान्य जनतेमध्ये आहे.
एकनाथ शिंदे हे अभ्यासू नेते नाहीत. ते लोकप्रिय सुद्धा नाहीत. त्यांची चिमुटभर लोकप्रियता ही ठाण्यातील जनतेपुरतीच मर्यादीत आहे. त्यांनी राजकारणात येवून बराच मलिदा हडपला. त्यातून बंडखोर व अपक्ष आमदारांना स्वतःच्या खिशात ठेवले, अशी भावना महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एका सामान्य व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण त्याचे कौतुक कुणालाच नसल्याचे दिसत आहे.
हे सुध्दा वाचा :
सामान्य माणूस ‘मुख्यमंत्री‘ पदी विराजमान झाला
मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असतांना चेहरा मात्र चोरा सारखा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…