टीम लय भारी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. ती माळ उध्दव ठाकरेंच्या गळ्यातून काढून एकनाथांच्या गळ्यात घातली. हे सर्व करतांना त्यांना खूप कष्ट सोसावे लागले. मात्र हे कष्ट चांगल्या कामासाठी खर्च झाले नाहीत. कोणाला तरी मागे खेचण्यासाठी त्यांना षडयंत्र रचावे लागले. त्यामुळे आज एकनाथ शिंदेंचा चेहरा चोरा सारखा झाला होता.
एकनाथांचा मराठी बाणा, हिंदूत्व सगळं ठिक आहे. पण ते ‘खाल्ल्या मीठाला जागले नाही‘ हे त्यांचे दुर्दैव आहे. कारण आज बोलतांना ते उसना आवसान आणून बोलत होते. त्यांच्यातला स्वाभिमान आणि अभिमान गळून पडला होता. कारण आपण कोणाला तरी फसवल्याची म्हणजेच अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. त्यात मोदी साहेब, अमित शहा आणि फडणवीसांच्या तालावर आता त्यांना नाचावे लागणार आहे. सगळी सूत्र फडणवीसांच्या हातात राहणार आहेत, हे सगळ्या जनतेला माहित आहे.
हे सुध्दा वाचा :