निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. या चोरलेल्या धनुष्य बाणासोबत निवडणुकीला सामोरे या, असे थेट आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ते म्हणाले, “आज शिवरात्र आहे. मात्र, आपले शिवधनुष्य चोरीला गेले आहे. या चोरांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू.” (uddhav thakre challanged to dknath shinde)
मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग जनता कुणाला निवडते ते पाहू, असे खुले आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे, अशी टीका त्यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावरही दावा सांगितला होता. त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाने आपण खचून गेलो नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेतून दिसत आहे. या निर्णयाचे पडसाद काय उमटतात ते येणार काळच सांगेल.
हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदेंनी ओळखले ‘जबाबदारीचे भान’
पंतप्रधानांनी आता जाहीर करावे, लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे : उद्धव ठाकरे
पक्ष गेले, चिन्ह गेले..! आता शिवसेना भवनासाठी होणार ‘सामना’? सविस्तर वाचा
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…