टॉप न्यूज

लढाई जिंकली! ओबीसींना राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, निवडणुका लवकरच होणार

टीम लय भारी

दिल्ली : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बांठिया अहवालावर शिक्कामोर्तब करीत आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असा निर्देशच आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. येणाऱ्या दोन आठवड्यांत उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे कोर्टाकडून बजावण्यात आले आहे. आधीसारखं सरसकट ओबीसी आरक्षण सगळ्याच निवडणुकांमध्ये लागू करण्याच्या कोर्टाच्या या निर्णयाने राज्याला अखेर खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणाचा नियम स्थगित झालेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका आणि इतर निवडणुकांसुद्धा लागू करण्यात आला आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या लढाईला आज अखेर यश मिळाले आहे.

दरम्यान, बांठिया अहवालात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याचे स्पष्टीकरण देत उर्वरीत निवडणुका दोन आठवड्यात घेण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे.

न्यायमुर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगानं पाहावा, असे कोर्टाने यावेळी सांगितले. प्रलंबित निवडणुक प्रश्नाच्या मुद्द्यावर टिप्पणी करीत दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे निर्देश सुद्धा कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागल्यामुळे महानगरपालिका आणि इतर राज्यातील निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी यावर युक्तीवाद केला, तर सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचे याचिकाकर्ते विकास गवळी यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला! सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

बाॅलीवूडवर पुन्हा ईडीचे संकट, ‘पॅडमान’ निर्माती प्रेरणा अरोरा अटकेत

सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

15 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

16 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

17 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

19 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

19 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

20 hours ago