लय भारी न्यूज नेटवर्क
अहमदनगर : एकनाथ खडसे, विनोद तावडे व प्रकाश महेता यांचे तिकिट दिल्लीतून कापले गेले आहे. दिल्लीत संसदीय मंडळाने हा निर्णय घेतला होता, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे राम शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी गिरीष महाजन उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना खडसे, तावडे व महेता यांना तिकिट नाकारल्याबद्दलचा प्रश्न विचारला. त्यावर महाजन म्हणाले की, हा निर्णय संसदिय मंडळाने घेतलेला आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो सगळ्यांनाच पाळावा लागतो. कदाचित तिकिट नाकारलेल्या या चार – पाचजणांना वेगळी जबाबदारी देण्याचा वरिष्ठांचा विचार असू शकेल, असेही महाजन म्हणाले.
संसदिय मंडळामध्ये स्वतः पंतप्रधान, अमित शाह, राजनाथ सिंग, राज्याचे अध्यक्ष असे दहाजण आहेत. ते ठरवतात कोणाला तिकिट द्यायचे, याकडेही महाजन यांनी लक्ष वेधले.