टॉप न्यूज

शरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

टीम लय भारी

नवी दिल्ली : अडीच वर्षांपूर्वी आमच्या पक्षाचे आमदार फुटले होते. हरियाणात आमदारांना ठेवले होते. त्यामुळे मी स्वतः लक्ष घालून सरकार वाचविले होते. आता शिवसेनेचे आमदार फुटलेले आहेत. त्यामुळे सरकार वाचविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे असेल तर तो निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकतात, असेही पवार म्हणाले. माझे शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोलणे झाले आहे. त्यांच्या अंतर्गत कलहाबाबत ते दुपारपर्यंत निर्णय घेतील. त्यानंतर ते संध्याकाळी आमच्यासोबत चर्चा करतील, असेही पवार यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या सरकारमध्ये काम करण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला काहीही अडचण नाही. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांची आहे. कारण मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, असेही पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक, ते शिवसेना सोडणार नाहीत : संजय राऊत

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

पूनम खडताळे

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

40 mins ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

1 hour ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

2 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

2 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

3 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

3 hours ago