लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ( south mumbai, loksabha Election … Here is the opinion of thackery group) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. मुंबईतील मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहूल शेवाळे व अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. राहूल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी बंड केले. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल देसाई शेवाळे यांच्यासमोर ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी माजी महापौर व माजी आमदार विशाखा राऊत यांची धावती मुलाखत घेतली. यावेळी विशाखा राऊत यांनी राहूल शेवाळे यांचा समाचार घेतला. दादर माहिम परिसरात आदित्य ठाकरे यांनी अनेक कामे केली आहेत. पण ही कामे आपणच केल्याचे राहूल शेवाळे यांनी त्यांच्या कार्यअहवालात नमूद केले आहे. राहूल शेवाळेंना पैसा खाण्याची चटक लागलेली आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे गटात गेले असल्याचाही आरोप विशाखा राऊत यांनी केला.
आदित्य ठाकरेंचे काम,श्रेय लाटताहेत राहुल शेवाळे !
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. मुंबईतील मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहूल शेवाळे व अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे.