टीम लय भारी
बेळगाव : 60 वर्षे महाराष्ट्राचे कर्नाटकात प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्याने तुम्हाला मराठी असून आसुरी आनंद होत असेल, तर तुमच्या बापाला एकदा नक्की विचारा की तुम्ही जन्मायच्या 280 दिवस आधी तो कुठे गेला होता ? (BJP government of Karnataka removed the statue of Shivaji Maharaj last year? Such questions were raised by Nitin Pradhan of Maharashtra Unification Committee, Belgaum.)
कर्नाटकच्या भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ? असे प्रश्न बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नितीन प्रधान यांनी उपस्थित केले.
संजय राऊतांचे भाजपला आवाहन, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा
Ola इलेक्ट्रिक बाजारात दाखल, ऑनलाइन विक्रीला सुरूवात
भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर भारतात पूर्वापार पासून चालत आलेली संस्थाने बंद पडली. त्यानंतर सीमारेषा आखल्या गेल्या आणि बेळगाव येथील मराठी भाषिकांच्या विरोधाला ना जुमानता कारवार, बेळगाव, निपाणी, खानापुर कर्नाटकात सामील करण्यात आले.
महाराष्ट्र आंदोलनात महाराष्ट्राची 107 लोक बायकामुलासहीत चिरडली होती. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला चेतवून 60 वर्षांपूर्वीपासून लढा द्यायला सुरुवात केली. ती मोहीम आता बेळगावातून हद्दपार झालेली आहे.
‘माझ्याकडे सत्ताधाऱ्याना गुद्दे द्यायला बरेच मुद्दे आहेत’
BJP announes state in-charges for four cpoll-bound states
महानगरपालिकेवरचा भगवा काढून तिरंगा न लावता लाल पिवळा फडकला लावला तरी तुम्ही समाधानी आहात असे आरोपही यावेळी नितीन प्रधान यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे साधारण राजकीय पक्ष नाही तर ती मराठी अस्मिता आहे.
एकीकरण समितीचा पराभव म्हणजे फक्त समितीचा पराभव नाही तर तो बापट, अत्रे-शंकरराव देव, नाना पाटील, अमर शेख, चिंतामणराव देशमुख, माडखोलकर, अण्णाभाउ साठे, आत्माराम पाटील, आंबेडकर-डांगे-प्रबोधनकार ठाकरेंसहीत संबंध मराठी माणसांचा-महाराष्ट्राचा पराभव असतो. असेही मत नितीन यांनी मांडले.