टीम लय भारी
मुंबई : राज्य सरकारला घाबरट म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्गात लागू केलेल्या संचारबंदीबद्दल आपली स्पष्ट नाराजी नोंदवली(Chandrakant Patil expressed his displeasure over the curfew imposed in Sindhudurg).
भाजपची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात पोहचण्याआधीच तिथे सात दिवसांची संचारबंदी लावण्यात आली. यात्रेत अडथळा आणण्यासाठीच हे करण्यात आले आहे. मात्र आमची यात्रा थांबणार नाही. संचारबंदी मागे घेतली नाही तर ती मोडून आम्ही यात्रा काढू. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’
ठाकरे सरकारला उठलाय पोटसुळ : प्रविण दरेकर
रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात त्यांनी संचारबंदी लावली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना केवळ सिंधुदुर्गात संचारबंदी का? नारायण राणे यांच्या यात्रेला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळाला. असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमार्फत केला.
राज्य सरकार फार घाबरट आहे. रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात त्यांनी संचारबंदी लावली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना केवळ सिंधुदुर्गात संचारबंदी का?राणे जी यांच्या यात्रेला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळाला.पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत आहे.ती हरली तर काय राहणार यांच्याकडे?4/5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 25, 2021
जयंत पाटलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली
Narayan Rane’s silence during Jan Ashirwad Yatra will be powerful: Chandrakant Patil
या ट्विट मध्ये मुख्यमंत्र्यांना उद्देशूनही चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, मुख्यमंत्र्यांना पोपट असे संबोधून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा जीव मुंबईत अडकल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी सवाल केला की, ‘पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत आहे. ती हरली तर काय राहणार यांच्याकडे?’