आरोग्य

मिरची कापल्यानंतर तुमच्या हाताची जळजळ होते? मग या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

स्वयंपाकघरात (Kitchen Tips) काम करतांना महिलांना अनेकदा हाताला लागून जाते. काही लोकांना स्वयंपाकघरात काम करणे सोपे वाटतं. मात्र, तेवढेच ते कठीण असते स्वयंपाक बनवतांना अनेकदा लाल किंवा हिरव्या मिरच्यांचा वापर केला जातो. या मिरच्या चिरतांना आपल्या हाताला जळजळ होते. (Kitchen Tips to get rid of burning hands after cutting green chilies) बोटांची आग देखील होते. त्यात चुकूनही आपला हात नाकाला, तोंडाला किंवा डोळ्यांना लागला तर त्रास होतो. हे सर्वांसोबत कधी न कधी होतेच. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स, ज्यांनी मिरच्या चिरून झाल्यांनतर तुमच्या हाताची आणि बोटांची आग होणार नाही. (Kitchen Tips to get rid of burning hands after cutting green chilies)

किशमिशच्या मदतीने घरबसल्या मिळवा चमकदार त्वचा, महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सला करा बाय-बाय

1. कोरफड 
मिरची कापल्यानंतर तुमच्याही हातात जळजळ होत असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. कोरफडीने हातांना मसाज केल्याने जळजळ शांत होण्यास मदत होते.

2. दही
दही ही प्रत्येक घरात उपलब्ध असलेली एक गोष्ट आहे. मिरची कापल्यानंतर जर तुमच्या हातात जळजळ होत असेल तर तुम्ही दह्याने हाताची मालिश करू शकता. असे केल्याने जळजळ शांत होण्यास मदत होते.

Health Tips: तुम्हाला पण बॉलीवुड एक्ट्रेस सारखं स्लिम व्हायचं आहे? मग आजच ट्राय करा ‘तूप कॉफी’

3. मध
स्वयंपाकघरात आढळणाऱ्या सामान्य घटकांपैकी एक म्हणजे मध. मध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मिरची कापल्यानंतर तुमच्या हातातील जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही मध वापरू शकता. यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.

4. लिंबू
लिंबाचा वापर जेवणात आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. उन्हाळ्यात लिंबाचा भरपूर वापर केला जातो. लिंबू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मिरची कापल्यानंतर तुमच्या हातात जळजळ होत असेल तर तुम्ही लिंबू चोळू शकता. यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.

व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ

5. खोबऱ्याचं तेल लावा
मिरच्या चिरुन झाल्यावर आपण पाण्याने हात धुतो. मात्र, तरी सुद्धा आपल्या हाताची जळजळ सुरुच असते.अशा वेळी खोबऱ्याचं तेल हातांना थोडावेळ लावून ठेवावं. त्यानंतर १५-२० मिनिटांनी हात धुवावेत.

6. बर्फ
मिरच्या चिरून झाल्यावर लगेच थोडावेळ बर्फ हातांवर चोळा त्यामुळे हाताची आग कमी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.

काजल चोपडे

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

10 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

10 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

10 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

11 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

11 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

14 hours ago