31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रGovernment Scheme Break : मोदी सरकारचा नव्या योजनांना ब्रेक!

Government Scheme Break : मोदी सरकारचा नव्या योजनांना ब्रेक!

नवी दिल्ली : भारत आधीच आर्थिक संकटात असताना कोरोनाचे संकट कोसळले. त्यामुळे देशाची आर्थिक अडचण आली आहे. दरम्यान, अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत कोणतीही नवीन योजना लागू न करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने जाहीर केला आहे. (Government  News Scheme Break)

सरकारने सुरू केलेल्या नव्या योजना या पुढच्या वर्षीपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. तर हा नियम पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजनांना लागू होणार नसल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंबंधी अर्थ मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. पण यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजना सुरूच राहतील.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी