आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपल्याला निसर्गाकडून वीज मिळत नाही ती आपल्याला निर्माण करावी लागते. म्हणूनच वीज ही पारंपारिक ऊर्जा स्तोत्रामध्ये मोडते. प्रत्येकाने विजेचा वापर करताना काळजी घेतली तर भरपूर विजेची बचत होऊ शकते. विजेचे बिल कमी येण्यासाठी केंद्र सरकारने वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार असून केंद्र सरकार विचार करत असलेल्या नवीन नियमानुसार वीज उपभोक्त्यांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येणार आहे. ग्राहकांसाठी दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारला जाईल.
केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम यामध्ये सुधारणा करणार आहे. दिवसा सौर उर्जेवर वीज पुरवठा केला जाईल, यामुळे दिवसा वीज दर कमी असेल. मात्र दिवसा वीज बिलात ग्राहकांची 20 टक्के बचत होऊ शकते. पण रात्री वीज बिल 10 ते 20 टक्क्यांनी महागणार आहे. रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करण्यात येईल. वीज दिवसा कमी व रात्री जास्त असेल तर विजेचे बिल कसे कमी होऊ शकते?
हे सुध्दा वाचा:
नंदुरबार नगरपालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल
दापोली हर्णे मार्गावर ट्रक व मॅजिक रिक्षाचा अपघात; आठ जणांचा मृत्यू
पावसाच्या आगमानाने बळीराजा सुखावला, कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकरी सरसावला
विजेचा वापर सकाळी सौरऊर्जेचा जास्त वापर करणार आहे तर रात्रीच्या वेळेत कोळशावर तयार झालेला वीजपुरवठा करणार आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा आणि पाणी यांपासून वीज बनवली जाते. स्वीडन सारखा देश ९०% वीज ही कचऱ्या पासून बनवतो. त्यासाठी ते इतर देशामधून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची आयात करतात.