लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कोर्टाच्या आदेशाचं, निर्णायचं स्वागत करतो. आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा पराजय नाही, तर भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे.
फडणवीस म्हणाले, या निर्णयाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. अतिशय चांगलं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. सर्व लोक शांतता प्रस्थापित करत विविध सण, सर्वजण साजरं करतील अशी मी आशा करतो, असंही फडणवीस म्हणाले.