35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअयोध्येच्या न्यायासाठी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत : उध्दव ठाकरे

अयोध्येच्या न्यायासाठी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत : उध्दव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एक वाद सुरू होता. त्या वादावर आता पडदा पडला आहे. म्हणून मी सर्वप्रथम न्यायदेवतेला या न्यायासाठी साष्टांग दंडवत करतो.

पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, अनेक वर्षांनी हा न्याय मिळाला आहे. इतकी वर्ष आपण प्रभू रामचंद्र यांच्याविषयीच्या अनेक कथा ऐकत होतो. मात्र, त्यांचा जन्म कोठे झाला होता, होता की नव्हता याच्यावर वाद सुरू होता. तो वाद आज संपला आहे याचा मला नक्कीच आनंद आहे. अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आला आहे. शिवनेरीला जाणार आणि त्यानंतर पुन्हा अयोध्येत जाणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

ठाकरे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाला विलंब होत असल्यानंच राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. या मागणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदुत्ववादी संघटनांचाही पाठिंबा होता. मला असं वाटतं जी हिंदूंची श्रद्धा आहे. भावना आहे त्या भावनेला आज न्याय मिळालेला आहे. याचा आनंद व्यक्त करत असताना मी सर्वांना सूचना केलेल्या आहेत की कुठेही वेडवाकडं होईल अस काही करू नका, आनंद जरूर साजरा करा,” असं ते म्हणाले

काही लोक त्या आंदोलनात शहीद झाले त्यांना अभिवादन करतो. मी अयोध्येत गेलो. शरयूच्या तिरावर आरती केली. जाताना शिवनेरीची माती घेऊन गेलो होतो. २-३ दिवसांमध्ये मी पुन्हा एकदा शिवनेरीवर जाणार आहे. शिवरायांना वंदन करणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अयोध्येला जाईल, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली.

मी स्वतः लालकृष्ण आडवाणींच्या भेटीला जाणार…

वाद आज संपलेला आहे. हा निकाल स्वीकारला त्याबद्दल समाजातील सर्व घटकांचे धन्यवाद. सर्व हिंदुंना आज बाळासाहेबांची आठवण येत असेल. अशोक सिंघल, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचीही आठवण येत आहे. या निकालानंतर मी स्वतः लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेणार आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी