31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीमुळे परप्रांतीय कामगारांची गावी जाण्यासाठी घाई

पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीमुळे परप्रांतीय कामगारांची गावी जाण्यासाठी घाई

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे महाराष्ट्र सरकार महराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. लॉकडाऊन झाले तर गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच भितीने आता महाराष्ट्रात वास्तव्यास असणारे परप्रांतीय कामगारांनी गावी जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसारमाध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्र सरकारने अद्याप लॉकडाऊनचा ठोस निर्णय घेतलेला नाही. परंतु, आम्हाला गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा स्वत:ची फरफट होऊन द्यायची नाही, असे परप्रांतीय कामगारांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी २४  मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्करला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झाले आहेत. लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी. जेणेकरून आम्ही येथे अडकून पडण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या चर्चेमागे लेबर कॉन्ट्रॅक्टर?

राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा तापवण्यामागे लेबर कॉन्ट्रॅक्टर्सच्या लॉबीचा हात असल्याचे म्हटले जाते. जेणेकरून अनिश्चितता वाढल्यास लेबर रेट आणि कंत्राटांची मुदत वाढवता येईल. परंतु, या सगळ्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहे. राज्याला दुसरा लॉकडाऊन परवडणार नाही, असे मत उद्योगविश्वातून व्यक्त केले जात आहे.

छोट्या कंपन्यांमधील कामगार गावी परतायला सुरुवात

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाला कोरोनाचे ३० हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ असेल. त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी