सतत बदलणाऱ्या हवामान ऋतुमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी मुसळधार अशा वातावरणामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे सुद्धा हाल होत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला. याचा मानवी आरोग्य आणि शेतीवर देखील गंभीर परिणाम दिसून आला. त्यानंतर भारत हवामान विभाग (India Meteorological Department)ने आज आणि उद्या म्हणजेच ता.9 मार्च ते 10 मार्च रोजी कोकण किनारपट्टीलगत गोवा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण विभागासह गोव्यातील तापमान 2 ते 3 अंशाने वाढणार असून, येथील हवामानात उष्णता जाणवणार आहे. तर मध्य भारत आणि संपूर्ण राज्यात पुढचे दोन दिवस 4 ते 6 अंशाने तापमानात वाढणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आव्हान करण्यात येते. (Konkan coastlines heat)
उन्हाचा त्रास जाणवल्यास काय कराल?
हे सुद्धा वाचा :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी आज ठाण्यात होणार ‘राजगर्जना’
महाराष्ट्र बजेट 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट; घोषणांचा वर्षाव होणार?
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…
नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…
सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…
सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…
येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…