महाराष्ट्र

Navratri 2022 : एकनाथ शिंदे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जन नाही, मंडळाचा अजब हट्ट

दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदाच्या वर्षी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सवाचा सण साजरा करण्यात आला. नऊ दिवस देवीची मनोभावे पुजा करून काल दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन करण्यात आले, परंतु याच पार्श्वभूमीवर एका मंडळाने देवीचे अद्याप विसर्जनच केले नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे सगळीकडे या मंडळाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. आमंत्रण देऊन सुद्धा देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाहीत म्हणून ठाण्यातील एका मंडळाने देवीचे विसर्जन केलेच नाही. एकनाथ शिंदे जोपर्यंत देवीच्या दर्शनासाठी येत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जनच करणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कळवा येथील विटावा परिसरातील सूर्यनगर भागातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टकडून यंदा सुद्धा जल्लोषात देवीचे स्वागत करण्यात आले. नित्यनियमाने देवीची नऊ दिवस मनोभावी पुजा करून हा उत्सव या मंडळाकडून यथोचित साजरा करण्यात आली, यावेळी सर्वसामान्यांसाठी सहज भेटीगाठी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या देवीच्या दर्शनाला यावे असे मंडळाला वाटत असल्याने त्यांनी त्याबाबतचे आमंत्रण सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले, परंतु राज्याचा प्रचंड पसारा सांभाळण्यात मुख्यमंत्री शिंदे व्यस्थ होते शिवाय दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीने सुद्धा त्यांनी उसंत मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा…

Job Updates : ‘नॅशनल इंस्टिट्यूट’मध्ये मेगा भरती, पगार ऐकाल तर अचंबित व्हाल

Mumbai News : मुंबई विद्यापीठात दारुच्या बाटल्यांचा खच, शिंदे गटाकडून विद्यापीठाला आहेर

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तिला बिहारमधून अटक

कारण कोणतेही असले तरीही एकनाथ शिंदे यांना नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टच्या देवीच्या दर्शनाला जाणे शक्य झाले नाही, त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. या नाराजीमुळे त्यांनी दसऱ्याचा सण संपला तरीही अजूनही देवीचे विसर्जन केलेले नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊन देवीचे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत देवीचे विसर्जन न करण्याचा हट्टच या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आता तरी एकनाथ शिंदे यांचे लक्ष या मंडळाकडे जाईल का आणि देवीचे दर्शन घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकांना सर्वसामान्यांचे कैवारी वाटतात. त्यांच्या साध्या, आपलेपणाच्या स्वभावामुळे सर्वसामान्यांना ते लगेचच आपलेसे वाटतात, शिवाय त्यांच्यातील एक होऊन त्यांना ऐकून घेण्याची शैली मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्यामुळे अनेकजण सहजपणे त्यांना आपल्यातील एक मानतात, मात्र आता हीच गोष्ट मुख्यमंत्र्यांना आता भारी पडतेय का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

13 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

14 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

14 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

15 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

15 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

17 hours ago