33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदेशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला निवडून देणे ही काळाची गरज असून नाशकातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी कंबर कसावी,असे आवाहान माजी आमदार वसंत गिते यांनी केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी त्रंबक तालुक्यातील ठाणापाडा जिल्हा परिषद गटातील सर्व गाव,वाड्या आणि पाड्यांना भेटी दिल्या.

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi) निवडून देणे ही काळाची गरज असून नाशकातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी कंबर कसावी,असे आवाहान माजी आमदार वसंत गिते ( Vasant Geete) यांनी केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी त्रंबक तालुक्यातील ठाणापाडा जिल्हा परिषद गटातील सर्व गाव,वाड्या आणि पाड्यांना भेटी दिल्या.(The need of the hour is for the India-led government to come to power in the country: Former MLA Vasant Geete)

तेथील नागरिकांची विचारपूस करून त्या परिसरातील समस्या व प्रलंबित प्रश्नांची माहिती जाणून घेतली त्यावेळी गिते बोलत होते. राजाभाऊ वाजे यांना सर्वत्र पोषक वातावरण असल्याचे दौऱ्यात आढळून आले.आदिवासी तालुक्यांचा विकास केवळ इंडिया आघाडीच करू शकते हे लक्षात घ्या आणि राजाभाऊ वाजे यांच्या मशाल चिन्हावर शिक्का मारून त्यांना दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी दिल्लीला पाठवा, असे आवाहनही गिते केले. इंडिया आघाडी आदिवासी बांधव आणि वंचित घटकांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभी राहिली आहे.भाजपा प्रणित केंद्र सरकारने आदिवासी बांधवांना केवळ आश्वासनेच दिली.आता मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचून केंद्रात परिवर्तन घडविण्याची संधी जनतेने गमावू नये,असे इगतपुरी-त्रंबकचे आमदार हिरामण खोसकर यांनी. आपल्या मनोगतात सांगितले.

दौऱ्यात जिल्हाप्रमुख निवृर्ती जाधव,निवृत्ती लांबे, तालुकाप्रमुख समाधान बोडके, जाधव,नितीन लाखन, विधानसभा संघटक संपत चव्हाण,तालुका समन्वयक देविदास जाधव,तालुका पदाधिकारी,सुनिल भोये,विठ्ठल भोये,अंबादास महाडी,संतोष जाधव,महेद्र गावित,हारीजात गावित,धर्मराज खाले,चितामण गुजार आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी