33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र13 श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा...

13 श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : रेखा ठाकुर यांची मागणी

राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२  आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भरवलेल्या कार्यक्रमास उपस्थित अनुयायांमधील 13 श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असून, राज्य सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी केली आहे.

ठाकुर यांनी आरोप केला आहे की, राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दुर्घटनेस जबाबदार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षे पोटी पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला गेला. परिस्थिती हाताळण्यास सक्षम नसलेल्या यंत्रणे वर नियोजन शून्य पध्दतीने भार टाकल्या मुळे प्रचंड कडाक्याच्या उन्हात तासंतास बसवून ठेवल्यामुळे लाखो श्री सेवकांचे अतोनात हाल झाले व 13 सेवकांचा हकनाक बळी गेला. आतापर्यंत या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 13 आहे व 18 व्यक्ती अत्यवस्थ आहेत.

हे सुद्धा वाचा
अखेर सरकारला जाग आली ; खारघर घटनेच्या चौकशीसाठी नेमली एकसदस्यीय समिती ! 

निवृत्त पोलीस हवालदाराचे मारेकरी गजाआड 

प्रेयसीसोबत राहण्यासाठी क्रूर बापाने केली 2 वर्षीय चिमुकल्याची हत्या

महाराष्ट्र शासनाच्या बेजबाबदार व कल्पनाशून्य नियोजनात मुळे लाखो श्री सेवकांचे अतोनात हाल झाले व 13 निष्पाप जीव बळी गेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या हलगर्जी व बेजबाबदार भूमिके बद्दल सरकारवर सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र भूषण सारखे शासकीय पुरस्कार हे शासकीय कार्यक्रमात शासकीय स्थळी आयोजित केले जातात. परंतु 16 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यास एक शासकीय कार्यक्रम असे स्वरूप देण्या ऐवजी धार्मिक व राजकीय सोहळा असे स्वरूप देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला धर्माधिकारी यांचे अनुयायी मानतात.

सन्मान सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा व राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा अट्टाहास एकनाथ शिंदे यांनी केला आणि त्याला उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने मूक संमती दिली. सांस्कृतिक खात्याने अशा भपकेबाज कार्यक्रमाला विरोध केला होता, असे वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाले आहे. असे असेल तर ती गंभीर बाब आहे, असे रेखा ठाकुर यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी