टीम लय भारी
मुंबई: भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( sujay vikhe patil ) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत.
राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे, त्यांनी कोणतीही मनमानी करावी त्याला कोणी काही करणार नाही. शिवसेना मूक बायको प्रमाणे वागत आहे. काँग्रेसला तर लग्नाची पत्रिका नाही तरीही ते लग्नाला जेवायाला गेले आहेत. डॉ. विखे पाटील नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वऱ्हाडींची उपमा त्यांनी दिली.
हे देखील वाचा: