टीम लय भारी
मुंबई : राज्यात ठाकरे सरकार पडून लवकरच भाजपचे सरकार अस्तित्वात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणे जवळजवळ निश्चित झाले आहे. पण राज्यात महाविकास आघाडी सरकारच कायम राहावे, असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. भाजपचे सरकार आल्यावर मुंबईचे काही खरे नाही, अशा आशयांचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
असाच काहीसा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ‘वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरदराव पवार, विलासराव देशमुख ही माणसे वेडी नव्हती, ज्यांनी शिवसेनेला ताकद दिली. जोपर्यंत सेना आहे, तोपर्यंतच मुंबई मराठी माणसांची आहे. तो गुजराती तोतला तर टपुन बसलाच आहे. मुंबई वाचवायची असेल तर सेना वाचली पाहिजे.’ लिहिण्यात आले आहे.
तर शरद पवार हे आज या वयातही मुंबई वाचविता या दृष्टीने मैदानात उतरले आहेत. त्यांचे इतके वय असून देखील, कॅन्सरच्या जखमा घेऊन ते आज मैदानात उतरले आहेत. तर एकनाथ शिंदे सारखा व्यक्ती गद्दारी करून महाराष्ट्र विकायला निघाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना देखील विदर्भ वेगळाच करायचा आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यानुसार ते काम करत आहेत. पण या गोष्टीला सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत असल्याचे लिहिण्यात आले आहे.
जर मुंबईला वाचवायचे असेल तर, या प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे. मुंबई ही महाराष्ट्राचा श्वास आहे, मुंबई गेली की महाराष्ट्राचे तीन तेरा वाजलेच समजा. मुंबई वाचवायची असली तर काहीही करून सेना टिकवली पाहिजे, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही पोस्ट कॉपी करून जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात आले आहे.
एकंदरीत महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष महत्वाचा का आहे? इतर पक्षातील नेत्यांनी देखील आतापर्यंत शिवसेना वाढविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी प्रयत्न का केले? इतर पक्षातील नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन मोठे का केले? याबाबत लिहिण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा :
अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या
फडणवीसांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा
पुढील दीड महिना पर्यटकांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची दारे राहणार बंद
राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका…
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…
डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court…
लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…
२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…