31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबई‘तांडव’बाबत आलेल्या तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई होईल, पण…; अनिल देशमुखांचा केंद्राला सल्ला

‘तांडव’बाबत आलेल्या तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई होईल, पण…; अनिल देशमुखांचा केंद्राला सल्ला

टीम लय भारी

मुंबई : सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘तांडव’ या वेबसीरीजबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्यावर नियमानुसार करवाई होईल. पण केंद्र सरकारने याबाबत पावलं उचलली पाहिजेत असं मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी व्यक्त केलं आहे.

माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, “आमच्याकडे ‘तांडव’ वेबसीरीजबाबत तक्रार आली असून त्यावर कायद्याप्रमाणं कारवाई केली जाईल. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत कायदा आणावा”

‘तांडव’ ही वेबसीरीज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली असून यामध्ये हिंदू देवतांबाबत काही आक्षेपार्ह विधानं आणि धार्मिक भावना दुखावतील असं भाष्य करण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या काही नेत्यांनी केला असून या वेबसीरीजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे देखील या वेबसीरीजविरोधात तक्रार आली असून असे वाद टाळण्यासाठी ओटीटीसाठी सेन्सॉरशीपची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी