भारताने चीन आणि अमेरिकेप्रमाणे विकसीत व्हायचे ठरवले तर भारताचा विकास होऊ शकणार नाही. भारताचा विकास हा भारताची दृष्टी, येथील परिस्थीती, लोकांची स्वप्ने, आशा, आकांक्षा, परंपरा, संस्कृती हा दृष्टीकोण समोर ठेवून प्रगती केल्यास भारत एक विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केले.
मुंबईत भारत विकास परिषदेच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही भारत आहोत, भामाशाह आमच्या पाठीशी आहे, तशी भारत विकास परिषद आहे. भारताच्या विकासाची स्वतःची दृष्टी आहे, स्वतःचा स्वभाव आहे. आपल्याकडे विकासाची चार साधने आहेत – अर्थ, काम, मोक्ष आणि धर्म. आणि भारत हा एक धार्मिक देश आहे, या गोष्टी भारताला इतर देशांपासून वेगळे करतो. भारताचा वसुधैव कुटुंबकम हा मंत्र आहे आणि सर्वांचा विकास हाच विकास आहे. मोहन भागवत म्हणाले, ‘भारताचे प्राचीन चारित्र्य पाहता भारत हे जगाला शांततेचा संदेश देणारा विश्वगुरू आहे. सगळे देश भारताला याच रूपात पाहतात. भारत विकास परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारताचे चारित्र्य आणि स्वरूप जाणून सेवा करताना जगले पाहिजे.
हे सुद्धा वाचा
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी
राज्य सरकारचा मोठा निर्णय, 1000 हून अधिक शिक्षकांची भरती करणार
मोहन भागवत आधी म्हणाले, ‘भारत मोठा होत आहे, म्हणूनच आज भारताला जी-20 मध्ये आमंत्रित आहेत. म्हणूनच आज आपण रशियाला लढाई थांबवायला सांगू शकतो. आधी म्हटलं असतं तर रशियाने आपल्याला हाकलून दिले असते, पण आज भारत समृद्ध होत आहे, त्यामुळे कुणीही आपल्याला असे म्हणू शकत नाही.
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…