फोटो गॅलरी

पावसात फिरायला जायचंय ? पण ठिकाण सापडतं नाही… मग हे वाचाच

पाऊस सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतं ते पावसाळी सहलीचे. उंचच उंच डोंगरावरून धबधबे आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी सगळ्यांची रेलचेल सुरू होते. दाट धुक्याने आणि नटलेल्या हिरवळीने ही वनराई हौशी पर्यटकांचे स्वागतच करत असते. मग आपण तरी मागे का राहायचे. अशीच काही ठिकाणे आहेत ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिथं तुम्ही तुमची सुट्टी अगदी आनंदात घालवू शकता.

  1. जुम्मापट्टी हा नेरळ आणि माथेरान दरम्यान असलेला धबधबा आहे. हा धबधबा मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर आहे. पावसाळा सुरु झाला की आठ दिवसात जुम्मापट्टी धबधबा वाहू लागतो. येथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

2.  पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून माळशेज धबधबा हा प्रसिद्ध आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून माळशेज घाटापर्यंत सुमारे 85 किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर द-याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो.

3. बदलापूरमधील कोंडेश्वर हा धबधबा खूप प्रसिदध आहे. बदलापूर स्टेशन वरुन ५-६ किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा दाट जंगलाच्या मध्यभागी आहे. सभोवतलाचा परिसर अतिशय सुंदर असून मनमोहक आहे.

4. पांडवकडा हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला खारघरमधील धबधबा आहे. कड्यावरुन कोसळणारे पाणी आणि कर्कश आवाज हा भीतीदायक वाटतं असतो.

5. दाभोसा आणि हिरडपाडा हा पालघरमधील जव्हार या ठिकाणी आहे. जव्हार तालुक्यापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे आहेत. या धबधब्याच वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महिने सुरु असल्यानं पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो.

6. देवकुंड हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात धबधबा आहे. भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांच्या ट्रेक नंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते. मुंबईपासून १२५ किलोमीटर वर आहे. देवकुंड धबधब्याला ताम्हिणी घाट म्हणून सुध्दा ओळखले जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

पावसात सहलीला जाण्याचा प्लॅन करता ना. मग आर्वजून या ठिकाणी भेट द्या. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणालाही भेट द्या.

 

रसिका येरम

Recent Posts

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

3 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

3 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

4 hours ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

4 hours ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

4 hours ago

चर बाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद नाहीच;पाणी कपातीचे संकट कायम

उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…

4 hours ago