टीम लय भारी
मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत (atmanirbhar bharat abhiyan) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध योजनांची घोषणा दोन टप्प्यात केली. यानंतर आता विरोधीपक्ष काँग्रेससह सोशल मिडियावरही चौफेर टीका केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन टप्प्यांत यांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात मध्यम लघु आणि कुटीर उद्योगांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली. दुस-या टप्प्यात स्थलांतरित मजूर आणि शेतक-यांसाठी सरकारने मदतीचे पेटारे खुले केले. मात्र, यावरून आता राजकारणही तापू लागले आहे.
श्रीमती निर्मला सीतारमन के आर्थिक पैकेज के दूसरे दिन की घोषणाओं का अर्थ -:
“खोदा पहाड़, निकला जुमला”,#JumlaPackage
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 14, 2020
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आर्थिक पॅकेजवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ‘श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेजसंदर्भात दुस-या दिवशी केलेल्या घोषणांचा अर्थ – ‘खोदा पहाड, निकला जुमला’, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
20 लाख करोड़ के जुमले की निकली हवा!
वित्त मंत्री ने कहा MSMEs को ₹3 लाख करोड़ का क़र्ज़ देंगे।
पर MSMEs के मंत्री, श्री नितिन गड़करी ने राज खोल दिया- बताया की सरकार द्वारा MSMEs उद्योगों का ₹5 लाख करोड़ बकाया।
यही है “गंजे को कंघी बेचना”!
वाह मोदी जी!https://t.co/i8NkdvDjhL— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 15, 2020
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ ट्विट करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. राहुल यांनी स्थलांतरित मजुरांचा एक मार्मिक व्हीडिओ ट्विट करत लिहिले आहे की, ‘अंधकार गडद आहे, कठीण परिस्थिती आहे, हिंमत ठेवा, आम्ही या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी उभे आहोत. सरकारपर्यंत यांच्या किंकाळ्या पोहोचवू. जनतेच्या हक्काची प्रत्येक मदत मिळवून देवू. देशातील सामान्य जनता नाही. हे तर देशाच्या स्वाभिमानाचा ध्वज आहे… तो कधीही झुकू देणार नाही.’
अंधकार घना है कठिन घड़ी है, हिम्मत रखिए-हम इन सभी की सुरक्षा में खड़े हैं। सरकार तक इनकी चीखें पहुँचा के रहेंगे, इनके हक़ की हर मदद दिला के रहेंगे। देश की साधारण जनता नहीं, ये तो देश के स्वाभिमान का ध्वज हैं… इसे कभी भी झुकने नहीं देंगे। pic.twitter.com/bBf48DiluY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 14, 2020
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. “निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचं सार, जगायचं असेल, तर आणखी कर्ज घ्या. आत्मनिर्भरतेचा अर्थ समजला का?,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.
निर्मला सितारामन जीके पत्रकार वार्ता का सार –
जीना है? और कर्जा लो।
आत्मनिर्भरता का अर्थ समझ गये?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 14, 2020
सोशल मिडियावरही चौफेर टीका केली जात आहे.
Since 2014 India is #atmanirbharbharat in terms of everything – unemployment, GDP, Demonitization etc.#BJPFailsIndia pic.twitter.com/8q7GC0kQgV
— Join Congress (@Join_Congress) May 15, 2020
Our prime minister is also doing a great job😡😡#atmanirbharbharat pic.twitter.com/oNQ79NKyf3
— Nadeem Khan❤🔥 (@mr_naddu) May 15, 2020
यहां अपने आप से आत्मनिर्भर हैं मोदी जी के 20 हजार करोड़ पर नहीं । #atmanirbharbharat #20lakhcrores #india #PMOfIndia pic.twitter.com/DTt4mU5nPa
— RAJA 🛑 (@iammrworld) May 15, 2020