लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ ची टीम शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोचली. (the voters will not get emotional in the lok sabha elections , but will vote after seeing the work of the goverment) यावेळी लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी नेवासा परिसरातील काही मतदारांसोबत गप्पा मारल्या.
२०२४ निवडणुकीत पक्षफुटीच्या राजकारणानंतर मतदार आता फारच विचारपूर्वक उमेदवारांना निवडताना दिसताहेत.
मोदीने शेतीचं -कपाशीचं वाटोळं केले ,डिझेल-पेट्रोलचे भाव कुठे गेले , दुधाचा बाजार काय आहे, राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेलं ५ रुपयांचं अनुदान कोणाला मिळालं अशा बऱ्याच सरकारला कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नांना मतदारांनीं लय भारीशी बोलताना मांडले.
शंकरराव गडाख यांचे शेतीबाबतीत नियोजन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे तर वाकचौरे गटविकास अधिकारी राहीलेले असल्यामुळे सरकारात जनतेच्या हिताची काम करून घेण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे . जो काम करेल त्यालाच मतदान करणार असे मत मतदारांनी व्यक्त केले.
लोखंडेंना मागच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा झाला असला तरी यावेळेस केलेलया कामाला लक्षात घेऊनच मतदान केलं जाईल असं परखड मत मतदारांनीं लय भारीशी बोलताना मांडले.