टीम लय भारी
औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचे तत्वज्ञान सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. आज काँग्रेस संकटात आहे. मात्र काँग्रेसचा विचारच शाश्वत आहे. माझ्या 50 वर्षांच्या सक्रिय राजकीय जीवनात मी अनेक उतारचढाव बघितले. हे ही दिवस जातील काँग्रेस पुन्हा उसळी घेईल कारण जनतेला भाजपाचा फोलपणा कळला आहे. अशा शब्दात काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल केला आहे(Balasaheb Thorat, Congress will rise again).
मुंबई युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवा क्रांती बुनियादी प्रशिक्षण शिबिरात बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, नेमका अजेंडा काय?
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,युवक काँग्रेस हा पाया आहे. पुढील किमान 50 वर्षांचे राजकीय करीयर युवकांसमोर असते. जनतेची सेवा केली की आर्शीवाद मिळतोच. काँग्रेसचा विचार मजबूत करा. तुम्ही आपोआप मजबूत व्हाल. राहुल गांधी यांच्या संघर्षाला ताकद द्यायची असेल तर आपल्याला देखील ताकदीने ही लढाई लढावी लागेल. असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
युवक काँग्रेसच्या वतीने पक्षाची ताकद तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम सर्वांना मिळून करायचे आहे. देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी सोबत मिळून ही लढाई लढायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा. अशा सूचनाही बाळासाहेब थोरात यांनी पदाधिका-यांना केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; आता आश्वासनांची पुर्तता लवकर करा ! : नाना पटोले
Congress workers need to highlight role of party in freedom struggle: Balasaheb Thorat
पक्षाचे विचार घरोघरी पोहचवण्यासाठी सर्वांना मेहनत घ्यावी लागणार आहे. युवक हीच खरी ताकद असून युवकांनी जास्तीत जास्त काँग्रेसमध्ये सहभागी होऊऩ काँग्रेसची ताकद वाढवावी. जातीयवादी शक्तींना हद्दपार करावे. असे आवाहन केले.