राजकीय

पुण्याला जिजाऊ नगर, शिवडी न्हावा शेवा मार्गाला ‘अंतुलेंचे‘ नाव देण्याची काॅंग्रेसची मागणी

टीम लय भारी:

मुंबई: बंडखोरांच्या मागणीला टक्कर देण्यासाठी काॅंग्रेसने नवा मुद्दा उचलून धरला आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतमध्ये ‘पुणे शहराला जिजाऊ नगर नाव द्या‘ तसेच न्हावा शेवा मार्गाला बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव द्या अशी मागणी केली. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्याचे घोषणा केली आहे. या विमानतळाच्या नावा वरुन खूप वादंग निर्माण झाला होता.

आजची मंत्रीमंडळाची बैठक विविध कारणांनी गाजली. यामध्ये नामांतराच्या विषयावर विशेष चर्चा झाली. भाजप आणि बंडखोर पक्षाचे आमदार सातत्याने औरंगाबादच्या नामांतराची मागणी करत आहेत. औरंगाबादचे संभाजी नगर करा ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवसेनेच्या निवडणूक अजेंडयावर देखील हा विषय होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. अशी तक्रार बंडखोर नेत्यांनी गेल्या आठ दिवसांत अनेक वेळा केली आहे.

हे सुध्दा वाचा:

वसंतराव नाईकांपासून ते शरद पवारापर्यंत प्रत्येक मराठी नेत्याने शिवसेनेला मोठे का केले?

अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

संदिप इनामदार

Recent Posts

सर्व्हिस रिव्हॉल्वरचा गैर वापर करणारा पोलीस नाईक बडतर्फ !

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर  पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक…

48 mins ago

नाशिक कलावंतानी साकारला शास्त्रीय नृत्यांचा सुंदर अविष्कार; तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद

तीनजागतिक विश्व विक्रमांची  नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते…

1 hour ago

उद्धव ठाकरेंना झटका! एम के मढवी यांना अटक

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे  गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी  (M…

1 hour ago

शरद पवार गटाला धक्का! स्टार प्रचारक अनिल देशमुखांवर गुन्हा

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर…

3 hours ago

‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ छगन भुजबळ मनोज जरांगेच्या टीकेवर भुजबळ संतापले

ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या,…

3 hours ago

लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज; आयसीएआय नाशिक शाखा

अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत…

4 hours ago