32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिले : शिवेंद्रसिंहराजे भोसले

आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिले : शिवेंद्रसिंहराजे भोसले

टीम लय भारी

मुंबई :-  राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिले आहे (MLA Shivendrasinharaje Bhosale said that internal politics has been given more importance than reservation).

“मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिल्याचा परिणाम म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मी पणा, अंतर्गत कुरघोड्या, प्रत्येकाचा सवता सुभा, प्रत्येकजण वेगळी भूमिका मांडत राहिला. यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर एकी राहिली नाही आणि त्याचे गंभीर परिणाम आता भोगावे लागत आहेत”, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे (MLA Shivendrasinharaje Bhosale has expressed).

संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून वेळ मागत असून मोदींनी का दिली नाही?; उद्धव ठाकरेंचा सवाल

“कोणी उद्रेक शब्दही काढू नका”, संभाजीराजेंची मराठा समाजाला विनंती

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयामुळे अन्यायग्रस्त मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मूक मोर्चा काढून मराठा समाजाने अभूतपूर्व लढा उभा केला. परंतु आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार कमी पडले आणि मराठा समाजाच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडले असून हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे”, अशी खंत ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली (The grief was expressed by MLA Shivendrasinharaje Bhosale).

Why the Maratha quota case in Supreme Court is about more than just the 50% limit to reservations

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणतात (MLA Shivendrasinharaje Bhosale says), “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण समाज पेटून उठला. सर्वत्र लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उच्च न्यायालयात आरक्षण टिकले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकेल, अशी खात्री सर्वांनाच होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही.

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाबतीत योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही. यासाठी राज्य सरकार कुठेतरी कमी पडले हे निश्चित. मराठा समाजावर कायम अन्याय झाला आहे. आता आरक्षण रद्द झाल्याने यापुढेही समाजावर अन्यायच होणार आहे आणि यासारखे दुर्दैव नाही.”

“मराठा समाजाच्या गरजेपेक्षा, आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच फारसे महत्व दिले गेले. मी पणा, अंतर्गत कुरघोड्या, प्रत्येकाचा सवता सुभा, प्रत्येकजण वेगळी भूमिका मांडत राहिला. यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर एकी राहिली नाही आणि त्याचे गंभीर परिणाम आता भोगावे लागत आहेत. आरक्षणापेक्षा मतांच्या राजकारणाला महत्व दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाने केलेल्या कष्टावर, आंदोलनावर अक्षरशः पाणी फिरले असून हा निर्णय समाजासाठी अतिशय कष्टदायी आणि दुर्दैवी आहे”, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे(MLA Shivendrasinharaje Bhosale has said).

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी