31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयरोहिणी शेलार यांचा विजय निश्चित : राज राजापूरकर

रोहिणी शेलार यांचा विजय निश्चित : राज राजापूरकर

टीम लय भारी

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात रंगत येऊ लागली आहे. गारगाव गटातून रोहिणी रोहिदास शेलार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य समन्वयक राज राजापूरकर यांनी हजेरी लावली होती. ह्या प्रचारामध्ये बोलताना ‘रोहिणी रोहिदास शेलार ह्यांचा विजय होणार हे निश्चित आहे’, असे प्रतिपादन राज राजापूरकर यांनी केले (Rohini Rohidas Shelar is sure to win, asserted Raj Rajapurkar).

अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

परमबीर सिंग फरार होण्यात केंद्राचा हात : नाना पटोले

प्रचारासाठी ते एका गावात आले होते. त्यावेळी त्यांनी मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. निवडणूक ही लढायची असते. ही एक स्पर्धा असते. यात विजय पराजय अशा दोन्ही घटना घडू शकतात. रोहिणीताईंच्या पाठीमागे उभी असलेली जनता आणि त्या जनतेची ताकद त्यांना नक्की विजय प्राप्त करून देईल. संपूर्ण गारगावचा त्यांना पाठिंबा आहे, असे राज राजापूरकर यांनी ट्विट करत सांगितले आहे (Raj Rajapurkar tweeted,Candidates have real power).

Maharashtra: SEC announces bypolls to OBC seats in local bodies on October 5

रोहिणीताई रोहिदास शेलार या पालघर जिल्हा परिषदेच्या गारगाव गटाच्या उमेदवार आहेत. पालघर जिल्ह्यातील १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी ५ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. त्या निमित्ताने राज राजापूरकर पालघरच्या दौऱ्यावर आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी