राजकीय

Shivsena Vs Shindesena : ‘धनुष्यबाण’ ही निशाणी शिंदे गटालाच मिळणार, शिंदे गटाचे ठाम मत

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडानंतर शिवसेनेतील अनेक बडे नेते, आमदार, खासदार यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. शिवसेना नेत्यांची मोठी फळीच बाहेर पडल्याने त्यांनी लगेचच आपणच शिवसेना असल्याचा दावा करण्यास सुरूवात केली आणि शिंदे आणि ठाकरे यांच्यात एकच कलह सुरू झाला आणि प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सत्तांतराच्या नाट्यानंतर अनेक कारणांनी शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली असली तरीही आता शिवसेना नेमकी कोणाची हा पेच सोडवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आता आमने – सामने आले आहेत. दरम्यान या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करताना भरत गोगावले यांनी केलेल्या एका दाव्याने आता खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करताना काही महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यावेळी गोगावले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. या प्रकरणाचा फैसला चार ते पाच वर्ष लांबेल, तरीही धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाच त्यांनी यावेळी केला, त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयाकडून तारीख पे तारीख देण्यात येत असल्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीस विलंब होत आहे. त्यावर 23 ऑगस्ट नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रमणा यांनी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले.

हे सुद्धा वाचा…

Congress President Election : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली? वाचा सविस्तर…

Asia Cup 2022 : भारत – पाकिस्तानच्या सामन्यात आता नवा ‘ट्विस्ट’, भारतीय संघात मोठे बदल

Fraud Case : ‘हॅलो, हाय ब्रो…मी आदित्य ठाकरे’ तोतया व्यक्तीकडून फसवणूकीचा प्रयत्न

रविवारी एका सभेत भरत गोगावले यांनी शिवसेनेवर बोलताना काही वक्तव्य केलं होतं. त्यावेळी गोगावले म्हणाले, अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणून गोगावले यांनी ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे मुळ शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत, परंतु शिवसेनेचे नाव वापरून सत्तेत विराजमान झालेले शिंदे गट ठाकरे गटासमोर हा पेच आणखी वाढवत आहे, त्यामध्ये भरत गोगावले यांनी केलेले वक्तव्य यामुळे तर ही बैचेनी आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात सुद्धा यावर उलट सूलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

2 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

2 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

3 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

4 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

4 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

4 hours ago