लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपचे नेते कालपर्यंत सांगत होते की, त्यांचाच मुख्यमंत्री होणार. मग ते मागे का हटले असा तिरकस सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप सत्ता स्थापन करणार नसेल तर शिवसेनेसोबतच्या युतीचे काय ?. आम्हाला अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपने शब्द दिला होता, त्याचे काय होणार अशीही विचारणा राऊत यांनी पत्रकारांसी बोलताना व्यक्त केली आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल ही उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. आणि कोणत्याही परिस्थिती शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा ठाम विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता, त्यावर काहीही बोलणे राऊत यांनी टाळले.
हे सुद्धा वाचा
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला शुभेच्छा : चंद्रकांत पाटील