राजकीय

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढणार?

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठकारेंची (Uddhav Thackrey) डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आज धुळे येथे विमानतळावर उदय सामंत प्रसार माध्यामांसमोर बोलत होते. त्यावेळी माध्यमांसमोर ते म्हणाले की, दसरा मेळाव्या संदर्भात आमची भूमीका असण्याचे कारण नाही. ज्यांनी दसरा मेळाव्याची (Dassera Melava) परवानगी मागितली त्यांना ती मिळेल. आम्ही शिवसेना (Shivsena) म्हणून काम करतो. आम्ही शिवसेनेला संपवत होते, त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला वाचवले. मी शिंदे गट म्हणून काम करत नाही. तर शिवसेना म्हणून काम करतो. मी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात शिवसेनेचा मंत्री म्हणून काम करत आहे. शिवसेनमध्ये राहून एकनाथ शिंदेना (Eknath Shinde) समर्थन देत आहे. शिवसेनेला घटक पक्षांचे नेते संपवत होते. त्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेने संदर्भात विधीमंडळात आणि सुप्रिम कोर्टात काही प्रश्न प्रलंबित आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे – जयंत पाटील

जाणून घ्या ! कसे आहे आज सुरु होणाऱ्या ‘आशिया चषक 2022­­­­’ चे स्वरूप

Hemant Soren : झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात

यंदाचा शिवसेना दसरा मेळावा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात होणार हा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी मागितली आहे. अद्याप पालिकेकडून याला परवानगी देण्यात आलेली नाही. शिंदे गट शिवसेना दसरा हायजॅक करते का? असा संशया यामुळे निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अदित्य ठाकरे यांनी या बाबत आज प्रत‍िक्रीया दिल्या आहेत. ते म्हणाले की, ‘दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेनचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे’. माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय. पण तुम्हाला माहित आहे. जे गद्दार सरकार आले आहे. ते दडपशाहीचे सरकार आहे. मुंबई मनपामध्ये प्रशासन बदलेले नाही. शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. जनता देखील हे बघत आली आहे. गद्दार हे खोके सरकार पुढे नेत आहे. खोके सरकारच्या मागे कोण होते, ते आता पुढे यायला लागले आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

शंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…

26 mins ago

कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; ‘अबीर गुलाल’ मालिकेचा प्रोमो रिलीझ

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय.…

41 mins ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी करणार होती भाजपच्या या नेत्यांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडी सरकारवर खळबळजनक…

54 mins ago

पंचवटी आणि नाशिक पूर्व मध्ये हॉकर्स व पथविक्रेत्यांवर कारवाई

महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व…

1 hour ago

मोदी सरकारचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी : अतुल लोंढे

कांदा (Onion) निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी…

2 hours ago

पंतप्रधानांविषयी बेताल वक्तव्ये करणा-या राहुल गांधींना मतदार धडा शिकवतील; केशव उपाध्ये

सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी व अवमानकारक उल्लेख करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी…

2 hours ago