टीम लय भारी
मुंबई : भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व समाजाचे लोक सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. मात्र गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा सरकारे त्यांना पाठीशी घालत आहेत. या अत्याचाराविरोधात काँग्रेसने आवाज उठवला असून बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी महिला व समाजावरील अत्याचार विरोधी दिवस पाळला जाणार आहे. दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
चैत्यभूमीवर बुधवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धरणे आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड, राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.