टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे सध्या लागू असलेला ‘लॉकडाऊन’ ( Lockdown4 ) ३१ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
सध्याच्या ‘लॉकडाऊन’साठी लागू असलेल्या सगळे आदेश वाढलेल्या लॉकडाऊनसाठीही लागू असतील. सरकारच्या सर्व संबंधित खात्यांनी त्याचे कटाक्षाने पालन करावे असे अधिसूचनेत म्हटले आहे.
‘लॉकडाऊन’संबंधी काही शिथीलता लागू करायची असेल तर त्याबाबत वेगळ्या सूचना केल्या जातील असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा