32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयउजनीचा पाणीप्रश्न पेटला, पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

टीम लय भारी

मुंबई :-  उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उजनी पाण्यावरून (Ujani water) सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात संघर्ष पेटला आहे. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. आता या आंदोलनाची धग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचली आहे. म्हणूनच पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे (Security outside Pawar home has been beefed up).

उजनीच्या पाणी (Ujani water) वाटपावरून सोलापुरातील काही शेतकरी बारामतीत आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्या आधीच पोलिसांना ३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांनी पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याने उजनीचा पाणी (Ujani water) प्रश्न पेटला आहे. इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला त्यावरून हा संघर्ष सुरू आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याच्या योजनेला तातडीने गती देणे- अशोक चव्हाण

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत ‘झिंगाट’ डान्सवरून दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

Maharashtra, Mumbai civic body vaccine tenders receive bids, but officials unsure of credibility

काय आहे प्रकरण?

गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न इंदापूर-सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे आणखी चिघळला आहे. उजनी धरणक्षेत्र परिसरातील पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला आहे. अवर्षणप्रण क्षेत्रातील आणि रखडलेली म्हणून इंदापूर तालुक्याला मंजूर झालेली योजना पाणी वाटप योजनेत बसत नसल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधाने रद्द झाली आहे. या योजनेचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे. कोणताही निर्णय झाल्यास एक गट नाराज होणार आहे आणि संघर्ष कायम राहील.

माझ्यासाठी इंदापूर आणि सोलापूर दोन्हीही समान आहेत. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांबरोबर येणाऱ्या काळात सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. दत्तात्रय भरणे, आमदार इंदापूर आणि पालकमंत्री सोलापूर जिल्हा सांडपाण्याचे गणित दाखवून अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने उजनीतून पाणी पळविण्याचा घाट घातला गेला आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ६०० कोटीची तरतूद सुचविली आहे. इंदापूरच्या शेतकऱ्यांना आमचा विरोध नाही. खडकवासला योजनेतून त्यांना पाणी द्या. पण उजनी पाणी (Ujani water) वाटपातून थेंब शिल्लक नसताना, हा अट्टाहास कशाला? प्रशांत परिचारक, आमदार उजनीचे पाणी (Ujani water) वाटप झालेले आहे.

आता योजनांसाठी थेंबही पाणी शिल्लक नसताना सांडपाण्याचे गणित दाखवून बारामती, इंदापूरला पाणी पळविण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. आंदोलने सुरू झाली आहेत. भाजपचे आमदार, खासदारांनी या योजनेला विरोध केलाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे तसेच शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, यांनीही विरोध केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी