नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील पिऊ शकतो.( benefits of drinking coconut water )नारळपाणी हे प्राकृतिक रित्या थंड पेय आहे . नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमची तहान भागण्यासोबत नारळातील पोषक तत्वांमुळे शरीराला फायदा देखील होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी पिणे अतिशय महात्व्वाच आहे . तसेच हे प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते .
सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणे आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर असते. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वर्कआउटच्या आधी शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते. म्हणून सकाळी वर्कआऊटच्या आधी याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिंड्ट्स, अमिनो ऍसिड , एंझाईम्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटामिन सी हे गुण असतात. नारळाचे पाणी हे कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत आहे.
नारळाचे पाणी हृदयासाठी खूप आरोग्यदायी मानले जाते. खराब कोलेस्ट्रॉलचे काम करण्यासोबतच नारळपाणी अनेक अंतर्गत अवयवांचे देखील रक्षण करते. त्याचबरोबर ज्यांना मुतखड्याचा त्रास होतो त्यांनी नारळाच्या पाण्याचे सेवन नक्की करावे . नारळाच्या पाण्यात 94 टक्के पाणी असल्यामुळे ते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. नारळाच्या पाण्यामुळे पोटॅशियम सायट्रेट आणि क्लोराईडचे अतिरिक्त घटक काढून टाकले जातात, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. नारळाचे पाणी त्वचेच्या पेशींचे नुकसान टाळते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने तुमची त्वचा सुधारते आणि सनबर्न सारख्या समस्यांपासून बचाव होतो.