टीम लय भारी
मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुंबईतील रस्त्यांवरून वाघ यांनी बीएमसीवर टीका केली आहे. जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या “ठग्ज ॲाफ बीएमसी‘ ला कोण वाचवत आहे? असा सवाल वाघ यांनी केला आहे (BJP leader Chitra Wagh criticizes Mumbai Municipal Corporation).
मुंबईत २५ हजार कोटींचे रस्ते बनवण्यात आले. परंतु बनवण्यात आलेले २५ हजार कोटींचे रस्ते कोणते आहेत. तसेच कोणत्या रस्त्यांचे खड्डे बुजवले. या रस्त्यांचे काम दिलेले कंत्राटदार कोण आहेत व याचा तपशील बीएमसीने मांडलाच नाही. असे प्रश्न चित्र वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पत्राची मंत्रालयासमोर होळी
चित्रा वाघ यांनी ट्विट करत बीएमसीवर ही टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रस्ते हा गंभीर प्रश्न बनला होता. या रस्त्यांच्या परिस्थितीवरून विरोधकांनी बीएमसीवर निशाणा साधला होता.
मुंबईत २५ हजार कोटींचे रस्ते बनले पण रस्ते कोणते आहेत.. खड्डे कुठे बुजवले.. कंत्राटदार कोण आहे.. याचा तपशील @mybmc नं मांडलाच नाही.#बीएमसी कोणाला पाठीशी घालतेय.. जनतेच्या पैशावर डल्ला मारणा-या
“ठग्ज ॲाफ बीएमसी‘ ला कोण वाचवतंय ? pic.twitter.com/VvgDTVAVyV— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 19, 2021
ठाकरे सरकार हे बगलबच्च्यांचे सरकार, चित्रा वाघ यांची बोचरी टीका
Why BJP needs a new strategy to win Maharashtra back from MVA