व्यापार-पैसा

PM Jan Dhan Yojana : जन-धन योजनेतून आजवर 25 लाख कोटी रुपये वितरित केलेत! केंद्रीय मंत्र्याचे विधान

देशातील गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी मोदी सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. या योजनेद्वारे सरकारने देशातील गरीब आणि ग्रामीण भागाला बँकेशी जोडले आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत शून्य शिल्लक असतानाही खाते उघडू शकता. सरकार प्रत्येक जनधन खातेधारकांना अपघात विमा आणि 1 लाख रुपयांच्या सामान्य विम्याचा लाभ देते. यामध्ये 1 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा जीवन विमा संरक्षण उपलब्ध आहे. एखाद्या खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. यासह, सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास 30,000 रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.

तुम्ही जन-धन खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खरं तर, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले की, प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांद्वारे आतापर्यंत 25 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केले गेले आहेत. जनगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) च्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी रेड्डी म्हणाले की, विविध कल्याणकारी योजना आणि सबसिडी अंतर्गत या खात्यांद्वारे लाभार्थ्यांना निधी पाठविला जातो. या 50 कोटी जनधन खात्यांपैकी निम्मी खाती महिलांची आहेत.

हे सुद्धा वाचा

Smita Patil : स्पॉट बॉयच्या घरासाठी पर्समधून पैसे काढून देणारी ‘स्मिता पाटील’

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विनंतीचा मान राखत भाजपने उमेदवार मागे घेतला; ठाकरेंनी पुन्हा पत्र लिहीत मानले फडणवीसांचे आभार

Pune News : पुणे शहरात ‘सेक्स्टॉर्शन’ वाढले! पोलिस आयुक्तांचे नागरिकांना खास आवाहन

केंद्रीय मंत्री म्हणाले, “जन-धन खाती उघडताना लोक प्रश्न उपस्थित करत होते की आपल्या देशात याची गरज आहे का? आज आम्ही जन धन खात्यांद्वारे गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजनांसाठी 25 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. ही एक उपलब्धी आहे.” रेड्डी म्हणाले की, आज गरिबांच्या जनधन बँक खात्यात 1.75 लाख कोटी रुपये जमा आहेत.

पंतप्रधान मोदींनी 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन केले
तुम्हाला बचत खाते उघडण्यासाठी, पासबुक प्रिंट करण्यासाठी, एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, क्रेडिट/डेबिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी यापुढे बँकेत जाण्याची गरज नाही. आता घराजवळच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील 2 डिजिटल बँकिंग युनिट्ससह एकूण 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन केले.

75 जिल्ह्यांमध्ये डीबीयू उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात देशभरातील 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स सुरू करण्याची घोषणा केली होती. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ७५ डिजिटल बँकिंग युनिट सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते.

प्रणव ढमाले

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

3 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

4 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

4 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

4 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

5 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

7 hours ago